पूर्वी पदार्थांची गोडी वाढवण्यासाठी साखरेपेक्षा अधिक वापर गुळाचा केला जायचा.

पूर्वी पदार्थांची गोडी वाढवण्यासाठी साखरेपेक्षा अधिक वापर गुळाचा केला जायचा. गुळही साखरेसारखा ऊसापासूनच तयार केला जातो, पण तरीही गूळ मात्र साखरेपेक्षा आरोग्यास जास्त फायदेशीर आहे. साखरेमुळे हळूहळू गुळाचं महत्त्व आणि वापरही कमी होऊ लागला. गूळ पोळी, पुरणपोळी, मोदक, चिक्की, शेंगदाण्याचा लाडू, तिळाचे लाडू यांसारख्या पांरपरिक पदार्थांमध्ये गुळाचा वापर आवर्जून केला जातो, पण हे झालं फक्त सणवारापुरत. एरव्ही मात्र गुळाचा तितकासा वापर होताना दिसून येत नाही. पण गुळाचा आहारात समावेश असायला हवाच कारण फक्त गोडवा वाढवण्यासाठी नव्हे तर आरोग्यासाठीदेखील गूळ फायदेशीर आहे.
----- गूळ खाण्याचे फायदे ---
----- गूळ खाण्याचे फायदे ---

– गूळ-शेंगदाणे खाल्ल्याने हिमोग्लोबिन लवकर वाढते.
– शारीरिक अशक्तपणा आल्यानंतर गूळ खाल्ल्यास जास्त फायदा होतो.
– शरीरातील धातुंची झीज भरून काढण्याचे महत्त्वाचे कार्य गूळ करतो
– थंडीत गूळ खाणं जास्त फायदेशीर असते, पण तो अतिप्रमाणात मात्र खाऊ नये कारण गूळ उष्ण असतो.
– मासिक पाळीच्यावेळी तीळ-गूळ खाल्ल्याने पोट दुखणे कमी होते.
‘ड’ जीवनसत्त्व मधुमेह उपचारावर फायदेशीर

– पाळी नियमित येत नसेल तर गूळ खाणं फायदेशीर ठरतं.
– रोजच्या आहारात गुळाचा समावेश केल्यास चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या दूर होते.
– जेवणानंतर गुळाचा एक खडा खाल्ल्यास पाचनशक्ती सुधारते.
– घसा खवखवत असल्यास गुळाचा खडा खल्ल्याने आराम मिळतो.
– पण गुळाच्या अति खाण्यामुळे मात्र रक्त दूषित होऊन अंगावर फोड येण्याचा धोका असतो., म्हणून ज्यांना त्वचेचे रोग असतील त्यांनी गूळ खाऊ नये.

मग असा उपयुक्त सेंद्रिय गूळ हवा असेल तर नक्कीच संपर्क करा आपल्याला उपलब्ध होईल ..
7588200044 / 7588200055
आमचे फेसबुक पेजला नक्कीच भेट द्या https://www.facebook.com/JivansatvaOrganicBasketPvtLtd/
ऑनलाईन ऑफलाईन मार्केटींगसाठी उद्योगसंस्कार
Comments
Post a Comment